पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय निश्चित होताच जागतिक नेत्यांकडून त्यांचे अभिनंनदन करण्यात आले. सर्वात प्रथम ट्वीट केले ते इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी. त्यात भावी काळात भारताबरोबर दहशतवादविरोधी लढय़ाला अधिक चालना देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही मोदी यांचे अभिनंदन केले. उपखंडातील शांततेसाठी भारताबरोबर कार्य करण्याची इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेना युतीने निर्विवाद यश मिळविल्याने पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीलाच अनुकूल वातावरण राहील, अशीच चिन्हे आहेत. दुसरीकडे कमकुवत झालेल्या काँग्रेसबरोबर आघाडी करून फायदा होईल का, याचा अंदाज घेऊनच राष्ट्रवादी पुढील वाटचाल करणार आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला २५ पैकी २३ जागा मिळाल्या. शिवसेनेने २३ जागा लढविल्या होत्या व त्यापैकी १८ उमेदवार विजयी झाले. राज्यात ४१ उमेदवार युतीचे निवडून आले असून, युतीला एकत्रित २२५ पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये आघाडी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी युती कायम राहण्याचे चित्र आहे. भाजप लगेचच मोडता घालण्याच्या मन:स्थितीत नाही. अर्थात, जागावाटप हा कळीचा मुद्दा असेल. शिवसेना जास्त ताणाणार नाही, अशी शक्यता आहे. कारण स्वबळावर लढून शिवसेनेचा फायदा होणार नाही. याऐवजी युतीलाच शिवसेनेची पसंती असेल. केंद्रात ३०० पेक्षा जास्त जागा मिळाल्याने भाजपला तशी मित्र पक्षांची गरज नाही. यामुळे शिवसेनेला फार काही ताणून धरता येणार नाही.
युती कायम राहिल्यास राज्यात विधानसभेलाही युतीला एकतर्फी यश मिळू शकते. कारण लोकसभेच्या पराभवाने विरोधक आधीच गडबडले आहेत. त्यातच काँग्रेसचा पार धुव्वा उडाला आहे. राष्ट्रवादी आक्रमकपणे लढण्याच्या तयारीत असला तरी पक्षाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कायम राहते का हा प्रश्न आहे.
नवी दिल्ली : 'मोदी है तो मुमकीन है', या गाण्याचे बोल सार्थ होताना दिसत आहेत. लोकसभेच्या एकूण 542 जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 350 हून अधिक जागा जिंकल्या आहेत. जागांच्या आकड्यांच्या बाबतीत एकटा भारतीय जनता पक्षाने 303 च्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत.
भाजपने 303 जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएने 352 जागा जिंकल्या आहेत. एनडीएचा हा विजय 2014 पेक्षाही मोठा असल्यामुळे जगभरातून मोदींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान भाजपने आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. तर मोदी 26 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
दरम्यान जनतेने काँग्रेससह महाआघाडीला मोठा दणका दिला आहे. काँग्रेस पुरस्कृत संयुक्त पुरोगामी आघाडीला (युपीए) केवळ 86 जागांवर आघाडी मिळाल्याचे दिसत आहे. तर अन्य पक्षांनी 104 जागा जिंकल्या आहेत.
अभूतपूर्व विजयामुळे मोदींचा पंतप्रधानपदापर्यंतचा मार्ग सुकर नव्हे तर निश्चित झाला आहे. वाराणसीतून मोदी यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढत विजय संपादन केला आहे. मोदींनी तब्बल 3 लाख 84 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. 2014 मध्ये मोदी 3 लाख 82 हजार मतांच्या फरकांने विजयी झाले होते.
महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा भाजप-शिवसेना युतीने जिंकल्या आहेत. त्यापैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या आहेत. त्यासोबत राष्ट्रवादीला 5, काँग्रेसला 1 आणि वंचित बहुजन आघाडीला 1 जागा जिंकता आली आहे.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. भाजपचा विजय जवळपास निश्चित आहे. एनडीएने(भाजप आणि मित्रपक्ष ) सध्या 349 जागांवर आघाडी मिळवली आहे. बहुमताचा टप्पा भाजपने केव्हाच पार केला असल्यामुळे देश-विदेशातून मोदींना शुभेच्छा दिल्या जात आहेत. मोदींना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सहवागचाही समावेश आहे.
विरुने ट्वीट करुन नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. विरुने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतीय जनतेने मोदींच्या बाजूने त्यांचा कौल दिला आहे. या ऐतिहासिक विजयासाठी मोदींचे अभिनंदन. मोदीजी तुमची दुसरी इनिंग आताच्या इनिंगपेक्षा अधिक चांगली होऊ देत. त्याद्वारे देशाचा विकास होऊ देत. जय हिंद." या ट्वीटसोबत विरुने मोदींनी सुरु केलेल्या #विजयीभारत हा हॅशटॅगही वापरला आहे.
दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 343 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 89 जागांवर आघाडी मिळाली आहे. 110 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्रातील 48 जागांचा विचार केला तर भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 1 आणि वंचित आघाडीने एका जागेवर आघाडी मिळवली आहे. देशभरात बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे निकाला जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यात शिवसेना-भाजप युतीने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली केली आहे. तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीच्या पदरी पुन्हा एकदा अपयश आलं आहे. राज्यातील ४८ जागांपैकी २३ जागांवर भाजप, १८ जागांवर शिवसेना, राष्ट्रवादी- ५, काँग्रेस- १ आणि एमआयएमने एका जागेवर विजय मिळवला आहे.
मतदारसंघ विजयी उमेदवार
नंदुरबार हिना गावित (भाजप)
धुळे सुभाष भामरे (भाजप)
जळगाव उन्मेष पाटील (भाजप)
रावेर रक्षा खडसे (भाजप))
बुलडाणा प्रतापराव जाधव (शिवसेना)
अकोला संजय धोत्रे (भाजप)
अमरावती नवनीत कौर राणा (राष्ट्रवादी)
वर्धा रामदास तडस (भाजप)
रामटेक कृपाल तुमाणे (शिवसेना)
नागपूर नितीन गडकरी (भाजप)
भंडारा-गोंदिया सुनील मेंढे (भाजप)
गडचिरोली-चिमूर अशोक नेते (भाजप)
चंद्रपूर बाळू धानोरकर (काँग्रेस)
यवतमाळ - वाशिम भावना गवळी (शिवसेना)
हिंगोली हेमंत पाटील (शिवसेना)
नांदेड प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)
परभणी संजय जाधव (शिवसेना)
जालना रावसाहेब दानवे (भाजप)
औरंगाबाद इम्तियाज जलिल (वंचित बहुजन आघाडी)
दिंडोरी डॉ. भारती पवार (भाजप)
नाशिक हेमंत गोडसे (शिवसेना)
पालघर राजेंद्र गावित (शिवसेना)
भिवंडी कपिल पाटील (भाजप)
कल्याण श्रीकांत शिंदे (शिवसेना)
ठाणे राजन विचारे (शिवसेना)
मुंबई-उत्तर गोपाळ शेट्टी (भाजप)
मुंबई - उत्तर पश्चिम गजानन कीर्तिकर (शिवसेना)
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व) मनोज कोटक (भाजप)
मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजप)
मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवाळे (शिवसेना)
दक्षिण मुंबई अरविंद सावंत (शिवसेना)
रायगड सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
मावळ श्रीरंग बारणे (शिवसेना)
पुणे गिरीश बापट (भाजप)
बारामती सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
शिरुर अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
अहमदनगर सुजय विखे (भाजप)
शिर्डी सदाशिव लोखंडे (शिवसेना)
बीड डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)
उस्मानाबाद ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
लातूर सुधाकरराव श्रंगारे (भाजप)
सोलापूर जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)
माढा रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
सांगली संजयकाका पाटील (भाजप)
सातारा उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग विनायक राऊत (शिवसेना)
कोल्हापूर संजय मंडलिक (शिवसेना)
हातकणंगले धैर्यशील माने (शिवसेना)
महत्वाच्या घटना
१८४४: तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
१८८३: न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.
१९४०: इगोर सिकोरसकी यांनी एका-रोटर हेलिकॉप्टर चे यशस्वी उड्डाण केले.
१९७६: ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या काँकॉर्ड विमानाची लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू झाली.
१९९१: एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९९४: २६ फेब्रुवारी १९९३ रोजी न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणार्या चार मुस्लीम दहशतवाद्यांना प्रत्येकी २४० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
२०००: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-३बी हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
२००१: १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.
जन्म
१८१९: इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९०१)
१९२४: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार रघुवीर भोपळे ऊर्फ जादूगार रघुवीर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८४)
१९३३: रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९९९)
१९४२: पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांचा जन्म.
मृत्यू
१९५०: भारताचे ४३वे गर्वनर जनरल आर्चिबाल्ड वावेल यांचे निधन. (जन्म: ५ मे १८८३)
१९८४: डब्ल्यू.डब्ल्यू.ई. चे स्थापक विन्स मॅकमोहन सीनिय यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९१४)
१९९५: इंग्लंडचे पंतप्रधान हॅरॉल्ड विल्सन यांचे निधन. (जन्म: ११ मार्च १९१६)
१९९९: पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक विजयपाल लालाराम तथा गुरू हनुमान यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९०१).
२०००: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९१९).
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.