नवी दिल्ली - ज्या 'मेक इन इंडिया' योजनेची सरकारने मोठ्या थाटामाटात सुरुवात केली होती, त्याला अपयश येताना दिसत आहे. 'मेक इन इंडिया' अंतर्गत देशाच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात येणा-या शस्त्रं आणि गरजू साहित्याचं उत्पादनच होऊ शकलेलं नाही.
यामागे अनेक कारणं आहेत. लालफितशाही, रटाळ आणि कंटाळवाणी सरकारी प्रक्रिया तसंच तांत्रिक अडचणी यांचा फटका भारतीय सैन्याला बसला असून, याशिवाय एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव.
'मेक इन इंडिया' अंतर्गत अडकलेल्या या अर्धा डझनहून जास्त प्रोजेक्ट्सची किंमत जवळपास 3.5 लाख कोटी आहे.
या प्रोजेक्ट्समध्ये फ्युचर इन्फंट्री कॉम्बॅट व्हिइकल्स (एफआयसीव्ही), लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर्स, नेव्हल मल्टी-रोल चॉपर्स, जनरल स्टेल्थ सबमरीन, फिफ्थ जनरेशन एअरक्राफ्ट, माईन काऊंटर मेजर व्हेसल्स (एमसीएमव्ही) यांचा समावेश आहे. (source : lokmat)
नवी दिल्ली - डोकलाम प्रश्नी कुटनीतीमध्ये भारताकडून चारीमुंड्या चीत झाल्यानंतर आता चीनने भारताला विविध आघाड्यांवर अडचणीत आणण्यासाठी कारस्थाने सुरू केली आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून चीनने जगातील सर्वात लांब बोगदा खोदण्याचा घाट घातला आहे. या बोगद्याद्वारे ब्रह्मपुत्रचे पाणी शिनजिंयांग प्रांतातील वाळवंटी प्रदेशात नेण्याचा चीनचा कुटील डाव आहे.
एकूण एक हजार किमी लांबीचा बोगदा खोदण्याचा चीनचा प्रयत्न असून, हा बोगदा जगातील सर्वात लांब बोगदा असेल असे जाणकारांचे मत आहे. मात्र या प्रकल्पावर अद्याप काम सुरू झालेले नाही.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, "सध्या चीन हा सर्वात मोठा बोगदा खोदण्यासाठीच्या आपल्या क्षमतेची चाचपणी करण्यासाठी एक छोटा बोगदा खोदण्याच्या प्रकल्पावर काम करत आहे.
चीनने ऑगस्ट महिन्यात युन्नान प्रांताच्या मध्यभागात या बोगद्याचे काम सुरू केले आहे. हा बोगदा 600 किमीपेक्षा जास्त लांबीचा असेल. (source : lokmat)
इंडोनेशियन ओपन… ऑस्ट्रेलियन ओपन… डेन्मार्क ओपन… आणि आता फ्रेन्च ओपन सुपर सीरीजच्या या विजेतेपदानं किदम्बी श्रीकांतला थोरामोठ्यांच्या पंक्तीत नेऊन बसवलं आहे.
एकाच मोसमात एकदोन नाही, तर चार-चार सुपर सीरीजची विजेतीपदं पटकावणारा किदम्बी श्रीकांत हा जगातला केवळ चौथा बॅडमिंटनवीर ठरला आहे.
जागतिक बॅडमिंटनच्या इतिहासात आजवर लिन डॅन, ली चॉन्ग वेई आणि चेन लॉन्ग या तिघांनीच एका मोसमात चार सुपर सीरीज जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.
भारताच्या किदम्बी श्रीकांतनं फ्रेन्च ओपन जिंकून त्या तिघांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. साहजिकच एक भारतीय बॅडमिंटनवीर या नात्यानं एकाच मोसमात सर्वाधिक सुपर सीरीज जिंकण्याचा पराक्रम श्रीकांतच्या नावावर जमा झाला. (source : abpmajha)
नवी दिल्ली : जुलै २०१७ ची जीएसटीआर-२ आणि जीएसटीआर-३ ही जीएसटी विवरणपत्रे भरण्यास अनुक्रमे ३० नोव्हेंबर आणि ११ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.
जीएसटीआर-२ विवरणपत्र भरणा-या व्यावसायिकांची संख्या सुमारे ३०.८१ लाख आहे. हे विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ आॅक्टोबर होती. ती आता ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे.
यासंबंधीची अधिसूचना लवकरच जारी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जीएसटीआर-१ विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख १० आॅक्टोबर होती.
केपीएमजी इंडियाचे भागीदार प्रियजीत घोष यांनी सांगितले की, जीएसटीआर-२ विवरणपत्र भरताना करदात्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.
‘जीएसटीआर-२ ए’कडून स्वीकारलेल्या क्रेडिट जीएसटी पोर्टलवर शेवटच्या क्षणापर्यंत दिसत नव्हते. त्यामुळे या विवरणपत्रास मुदतवाढ मिळणे अटळच होते. जीएसटीआर-३ विवरणपत्र भरण्यासाठी ‘जीएसटीआर-२’चे क्रेडिट आवश्यक आहे. (source : lokmat)
मुंबई: रिलायन्स कम्युनिकेशन्सकडे (आरकॉम) असलेल्या थकित कर्जांपैकी सात कोटी रुपयांच्या कर्जाची फेड कंपनीचे भागभांडवल घेऊन करण्याचे धनको बँकांनी ठरविल्याने रिलायन्स उद्योगसमुहातील या महत्वाच्या कंपनीचे नियंत्रण अनिल अंबानींच्या हातून जाईल.
वायरलेस व्यवसाय एअरसेलमध्ये विलिन करण्याचे प्रयत्न फोल ठरल्यानंतर ही वेळ येणार आहे. सध्या ‘आरकॉम’चे ५९ टक्के भागभांडवल प्रवर्तक या नात्याने अनिल अंबानी यांच्याकडे आहे व त्या नात्याने कंपनीचे नियंत्रण त्यांच्या हाती आहे.
देशी व विदेशी धनको बँकांनी थकित कर्जाच्या बदल्यात भागभांडवल घेतल्यावर अंबानी यांच्याकडे कंपनीचे केवळ २६ टक्के भांडवल शिल्लक उरेल.
कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकानुसार रिझर्व्ह बँकेच्या ‘एसडीआर’ मार्गदर्शिकेनुसार सात हजार कोटी रुपयांचे थकित कर्ज कंपनीच्या ५१ टक्के भागभांडवलात परिवर्तित करण्याचा प्रस्ताव आहे.
जागतिक दिवस
जागतिक बचत दिन / राष्ट्रीय एकता दिन
महत्त्वाच्या घटना
१८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.
१८८०: धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
१९४१: माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
१९६६: दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
१९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
१९८४: भारताचे ६वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.
२०११: जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.
जन्म दिवस
१३९१: पोर्तुगालचा राजा एडवर्ड यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १४३८)
१८७५: भारतरत्न (मरणोत्तर) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०)
१८९५: क्रिकेटपटू सी. के. नायडू यांचा जन्म. (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९६७)
१८९७: चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान चियांग काई-शेक यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९७५)
१९४६: क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९९९)
मृत्य दिन
१९७५: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन याचं निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १९०६)
१९८४: भारताच्या ३र्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)
१९८६: लेखिका, बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के याचं निधन. (जन्म: ३ जून १८९२)
२००५: पंजाबी लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम याचं निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट१९१९)
२००९: मराठी ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते याचं निधन.
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.