राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

भारताच्या नियंत्रक व महालेखा परिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) डॉ. आंबेडकरांनी निरीक्षण नोंदल्याप्रमाणे ते संविधानांतर्गत असलेले सर्वाधिक महत्वाचे अधिकारी असतील. 

(b) नियंत्रक व महालेखापरिक्षकाचे पद हे मोठ्या प्रमाणात भारत सरकार अधिनियम, 1919 अंतर्गत असलेल्या महालेखा परिक्षकाचे प्रारूप आहे. 

(c) संसदेने नियंत्रक व महालेखा परिक्षकांची कर्तव्ये, अधिकार व सेवाशर्ती अधिनियम 1971 मंजूर केला आहे. 

(d) त्यांना नेमणूका करण्याचा अधिकार नाही परिणामत: कनिष्ठांच्या शिस्तीसंबंधी नियंत्रणाच्या बाबतीत सुद्धा अधिकार नाहीत जसे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशास आहेत. 

पर्यायी उत्तरे :

2.

जनहितार्थ याचिके (PIL) बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

(a) असे म्हटले जाते की, जनहितार्थ याचिकेने न्यायपालिकेचे लोकशाहीकरण केले.

(b) जनहितार्थ याचिकेने कार्यकारी आणि विधिमंडळास त्यांची जनतेप्रती असलेली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यास भाग पाडले.

(c) जनहितार्थ याचिकेने भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्याचा एक प्रयत्न केला आहे.

पर्यायी उत्तरे :

3.

गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट-1935 मधील खालील तरतूदी विचारात घ्या :

(a) या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो-इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व प्रदान केले.

(b) शेषाधिकार हे केन्द्र शासनाकडे सोपविले होते.

(c) या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली.

पर्यायी उत्तरे :

4.

संसदेने मंजूर केलेल्या 95 व्या संविधान दुरुस्ती कायद्याने :

5.

भारताच्या अॅटर्नी जनरल संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

(a) ते संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात.

(b) ते संसदीय समितीचे सदस्य होवू शकतात.

(c) ते संसदीय समितीमध्ये मतदान करू शकतात.

पर्यायी उत्तरे :

6.

राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ____________ साली करण्यात आली.

7.

कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे दोन आयोगामध्ये विभाजन केले गेले?

8.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

(a) आपले संविधान केन्द्र आणि राज्यांमध्ये फक्त कायदेशीर अधिकारांचीच नाही तर कार्यकारी अधिकारांचीही विभागणी करते.

(b) राष्ट्रपती कोणत्याही वैधानिक मंजूरीशिवाय, कोणतेही कार्यकारी कार्य राज्याकडे सोपवू शकतात.

(c) भारत सरकारच्या संमतीने, राज्याचे राज्यपाल राज्याच्या विषयीचे कार्य केन्द्र सरकार किंवा त्याच्या अधिका-यांकडे सोपवू शकतात. 

पर्यायी उत्तरे :

9.

भारतीय राज्यघटनेमधील काही कलमे बदलण्यासाठी किमान निम्म्या राज्यांच्या विधीमंडळांच्या मान्यतेची गरज असते. राज्य विधीमंडळांना मान्यता देण्यासाठी किती कालावधीची मुदत दिली जाते ?

10.

खालीलपैकी कोणते सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रात समाविष्ट आहेत?

(a) भारत सरकार आणि एक किंवा अधिक राज्ये यांच्यातील विवाद.

(b) दोन किंवा अधिक राज्यांमधील विवाद.

(c) संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या निवडणूकीसंबंधातील विवाद.

(d) आंतर-राज्य पाणी विवाद.

पर्यायी उत्तरे :

11.

खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळते ? 

12.

राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?

(a) दया याचना करणाच्या अर्जदाराला राष्ट्रपतींद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क आहे. 

(b) राष्ट्रपती कोर्ट मार्शल झालेल्या गुन्हेगाराला क्षमा करू शकतात. 

(c) राष्ट्रपती या अधिकाराचा वापर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या सल्ल्याशिवाय करू शकतात.

(d) राष्ट्रपती सर्व पुरावे नव्याने तपासु शकतात आणि न्यायालयापेक्षा वेगळा दृष्टीकोण मांडू शकतात. 

पर्यायी उत्तरे :

13.

24 व्या घटनादुरुस्तीनुसार :

(a) मूलभूत हक्कांसह राज्यघटनेतील कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याच्या संसदेच्या अधिकाराचा पुनरुच्चार करण्यात आला.

(b) घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणे राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आले.

(c) कलम 31 मधील 'भरपाई' या शब्दाऐवजी 'रक्कम' हा शब्द समाविष्ट करण्यात आला.

पर्यायी उत्तरे :

14.

राज्यपाल राज्याचे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवतात त्याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 

(a) राष्ट्रपती - त्या विधेयकाला मान्यता द्यावी की परत पाठवावे हा निर्णय घेण्यासाठी ते सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवू शकतात.

(b) राष्ट्रपतीवर अनुमती दिली आहे किंवा अनुमती राखून ठेवल्याचे घोषित करण्यासाठी संविधानाने कोणतेही वेळेचे बंधन घातलेले नाही.

(c) जर राज्य विधीमंडळाने तेच विधेयक दुस-यांदा पारित केले तर त्यास राष्ट्रपतींनी मान्यता देणे त्यांच्यावर बंधनकारक असते.

पर्यायी उत्तरे :

15.

दोन्ही सभागृहांमधील मतभेद दूर करण्यासाठी भारतात संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक आजपर्यंत ____________ वेळा घेण्यात आली.

16.

केवळ अनुसूचित जमातींसाठीचा पहिला राष्ट्रीय आयोग मार्च _____________ मध्ये स्थापन करण्यात आला.

17.

भारतीय राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्ट्रामधील केंद्र सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश केलेला आहे? 

(a) प्रत्यर्पण

(b) दीपगृहे

(c) बँकींग

(d) वजने आणि मापे यांची मानके प्रस्थापित करणे

पर्यायी उत्तरे :

18.

'उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात' खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे?

19.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) राष्ट्रपतीला कायद्यासंदर्भातील अथवा जनहितार्थ मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतो.

(b) राष्ट्रपतीला संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अथवा सदस्य यांना पदावरून दूर करण्याच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो.

पर्यायी उत्तरे :

20.

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकी' बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

(a) ती लोकसभेच्या सभापतीद्वारे बोलावली जाते आणि तिचे अध्यक्षस्थान स्विकारले जाते.

(b) ती बोलावली जाते जेंव्हा दोन्ही सभागृहांमध्ये घटनादुरुस्ती विधेयकाबाबत मतभेद असतात.

(c) ती बोलावली जाते जेंव्हा दोन्ही सभागृहांमध्ये धनविधेयकाबाबत मतभेद असतात.

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१६ GS-2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.